बेंगळुरू – ब्लाइंड टी-20 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार अजय रेड्डी आणि सुनील रमेश यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने शनिवारी अंतिम सामन्यात बांगलादेशवर 120 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने जेतेपदाची हॅटट्रिक केली. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या तीनही स्पर्धेत भारताने किताब आपल्या नावावर केला आहे. या विजयानंतर भारतीय ब्लाइंड संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
#FIFAWorldCup | मेस्सीला जेतेपदाची संधी; उद्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स लढत रंगणार
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 2 बाद 277 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून फलंदाजी करताना दोघांनी शतके साजरी केली. सुनील रमेशने 63 चेंडूत 24 चौकार आणि 1 षटकार खेचत 136 धावांची खेळी केली. तर अजय रेड्डीने 50 चेंडूत 18 चौकार लगावत 100 धावा करत शतक ठोकले. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 247 धावांची भागीदारी रचली.
Congratulations to the Indian team for clinching their third T20 World Cup for the Blind title! The whole nation is proud of you & reveling in your victory. @dcciofficial pic.twitter.com/OYzofmwgFj
— Jay Shah (@JayShah) December 17, 2022
प्रत्युत्तरात बांगलादेशला निर्धारित 20 षटकांत 3 बाद 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून सलमानने नाबाद 77 धावांची खेळी केली. भारताकडून ललित मीना आणि अजय कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.