मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात सभा घेत शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच बुलढाण्यात गद्दार आमदार खासदारांवर बोलताना, गद्दारांनी जाहीरपणे सांगावे की आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिल होत. त्यावर आता खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंना प्रती आव्हान दिल आहे.
”माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी. मी शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार. भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा विषय येतो कुठे?” असं प्रतापराव जाधव म्हणाले. “आम्ही शिवसेना पक्षातच आहोत.बाळासाहेबांच्याच विचारांनी आम्ही चाललो आहोत”असाही जाधव यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
राऊत यांच्यावर साधला होता निशाणा
संजय राऊत वारंवार हे सरकार लवकरच पडेल असं विधान करतात त्यावर आता राऊत तुम्ही जोशी केव्हापासून झालात ? असा सवाल प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केला होता. तसेच राऊत हे जनतेची करमणूक करत असल्याचे देखील जाधव यावेळी म्हणाले होते.