जळगाव – बैलगाडीतून शेताकडे जात असताना अचानक वीजेची तार तुटून पडल्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक शिवारात गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. यशवंत कामा महाजन (वय 62) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नहमीप्रमाणे शेतकरी यशवंत महाजन हे बैलगाडीतून शेताकडे जात होते. यावेळी बैलगाडी वीजेच्या तारेखाली असताना वीजेची तार तुटून बैलगाडीवर पडली. विद्यूतप्रवाह सुरु असल्याने बैलाला आणि महाजन यांना वीजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व वायरमन यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला विद्युत प्रवाह बंद करून त्यांना तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Bull and farmer die due to electric shock)