हिंगोली – डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडेगावात मोबाइल नेटवर्क नाही. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव वासीयांनी चक्क गाव स्थलांतर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाअधिकारी यांच्याकडे केली आहे.
परिसरात मोबाइल टॉवर नसल्याने नेटवर्कअभावी अनेक विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहे. विद्यापीठाच्या परीक्षादेखील ऑनलाइन चालू असल्याने मांडवी परिसरातील विद्यार्थ्यांना अनेकवेळा ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागत आहे. नेटवर्क नसल्याने ग्रामपंचायतीचे ऑनलाइन कामे, अनेक कामात खंड पडत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गावात मोबाईल नेटवर्क येत नसल्यानेमुळे संकट काळातही संपर्क साधता येत नाही व ऑनलाईन कामात पण अडथळा निर्माण होत आहे. येथील ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार ( दि 23) रोजी जिल्हाअधिकारी यांना निवेदनाद्वारे गाव स्थलांतर करा, अशी मागणी केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील वडगाव जवळा पांचाळ भागात मोबाईल नेटवर्कच राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती विषयक किंवा ऑनलाईन कामे करायला अनेक अडचणी येत आहेत. वडगाव परिसरात 5 किमी अंतरापर्यंत मोबाईल टॉवर नसल्याने नेटवर्क राहत नाही. त्यामुळे गावात नेटवर्क ऊपलब्ध करा अन्यथा आमचे गाव स्थलांतर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाअधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.