नवी दिल्ली : स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात विक्रम रचून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
27 वर्षीय मीराबाईने टोकियो ऑलिम्पिक 2020 चे सुवर्णपदकही जिंकले आहे. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलले. हा कॉमनवेल्थ स्पर्धेतील विक्रम होता.
पीएम मोदींकडून मीराबाई चानू यांचे अभिनंदन
Congratulations to Bindyarani Devi for winning a Silver medal at CWG, Birmingham. This accomplishment is a manifestation of her tenacity and it has made every Indian very happy. I wish her the very best for her future endeavours. pic.twitter.com/4Z3cgVYZvv
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2022
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले, की “असाधारण मीराबाई चानूने पुन्हा एकदा भारताला गौरवलं! बर्मिंगहॅम गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. त्याचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवीन खेळाडूंना प्रेरणा देते.”