नवी दिल्ली- देशात कट्टरता आणि हिंसाचार पसरवणे चुकीचे आहे. मात्र फाळणीच्या वेळी काही चुका झाल्या आहेत अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की, हिंदूकडूनही चूक झाली आहे. 1947 मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना दारूल इस्लाम हवा आहे ते भारतात राहु शकत नाही. दारूल इस्लाम पण आहे, हिंदूत्व पण आहे अजून ख्रिश्चनांचाही वेगळा मार्ग आहे असे नाही होऊ शकत.
आम्ही कोणाला अडवणार नाही. मात्र आमच्या इश्वराची निंदा करू नका. आम्ही तुमच्या इश्वराची करणार नाही. कोणावर हल्ला केला, हिंसाचार केला तर ते बेकायदेशीर आहे. नुपूर शर्मा कोणाला आवडतील नाही आवडणार हा काही मोठा विषय नाही. लोकशाहीत टीकेला स्थान असते. तो लोकशाहीचा भाग आहे. मात्र गळा कापून टाकेल वगैरे धमक्या मान्य करता येणार नाहीत.
ते पुढे म्हणाले की चाळीस हजारपेक्षा जास्त मंदीरे तोडली गेलीत. जेथे काही पर्याय नाही तेथे मंदीरे पुन्हा उभारली जावीत अशी आमची मागणी आहे. प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता. कुठे अन्य ठिकाणी नाही. त्यामुळे त्यांचे मंदीर अयोध्येतच होणार. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला होता. त्यामुळे त्यांचे मंदीर मथुरेतच झाले पाहिजे.
काशी विश्वनाथाचा विषयही तसाच आहे. त्यांना अन्य कुठे नेले जाऊ शकत नाही. ते तेथेच राहतील. अयोध्या, काशी, मथुरा यांचा कोणता पर्याय नाही. कोणी तलवार काढत असेल, हिंसाचार करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सूड घेणे हा शेवटचा पर्याय असतो. तो वापरला जाऊ नये.