मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांकडून दररोज भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. तपासादरम्यान या प्रकरणांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग असल्याचे उघड करत केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईला विरोध करत आपल्याला विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप करत भाजपकडून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही “ईडी”मार्फत चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून देशभर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, नवी मुंबई येथील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि “ईडी”वर निशाणा साधत “ईडी हे केंद्र सरकारच कुत्र” असल्याची टीका त्यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले, “ईडी” हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं. ईडी चावण्याची भीती दाखवून भाजप आपल्याकडे नेत्यांना वळवून घेत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. केंद्र सरकारची दादागिरी सुरू आहे. इंग्रजांच्या अत्याचाराप्रमाणे भाजप सरकारचा देशात अत्याचार सुरू आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून केंद्र सरकारविरोधात आम्ही लढत राहणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.
काळी वाळू अन उसळणाऱ्या लाटा! जगातील सर्वात सुंदर पण प्राणघातक आहे ‘हा’ समुद्रकिनारा !