नवी दिल्ली – काश्मिरी पंडितांच्या खऱ्या यातना दाखवण्याची बॉलीवूडमधील बहुतांश लोकांची आजही हिंमत नाही. त्यामुळेच द कश्मिर फाइल्स चित्रपटाचे कौतुक करण्याची वेळ येते तेव्हा ते गप्प होतात, अशी टीका या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला असून समीक्षकांसह सर्वसामान्य रसिकांनी चित्रपटाची भरपूर प्रशंसा केली आहे. काश्मिरी पंडितांना ज्या यातना भोगाव्या लागल्या आणि काश्मीर सोडून देशाच्या अन्य भागात आश्रय घ्यावा लागला त्याचे चित्रण त्यांनी या चित्रपटात केले आहे. सगळीकडून त्यांची प्रशंसा होत असताना बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतून या विषयावर मौन पाळण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निहोत्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शाहरूख खान, सलमान खान या सुपरस्टार्सना प्रेक्षकांनी काही किताब बहाल केले आहेत. त्या संबंधांत बीबीसीने एक बातमीही केली आहे. त्या अनुषंगाने अग्निहोत्री यांनी एक टिप्पणी केली आहे.
ते म्हणाले की, बॉलीवूडमध्ये जोपर्यंत किंग (शाहरूख), बादशाह, सुलतान (सलमान) आहेत तोपर्यंत हा उद्योग बुडतच जाणार आहे. लोकांच्या खऱ्या घटना मांडून त्याला म्हणजे चित्रपटसृष्टीला लोकांचा उद्योग बनवण्याची गरज आहे. तसे झाले तर चित्रपटसृष्टी जगाच्या चित्रपटसृष्टीचे नेतृत्व करेल.
Sri Lanka Crisis : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या ‘एक दिवस’आधी श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का
दरम्यान, त्यांच्या या टिप्पणीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी अग्निहोत्री यांचे समर्थन केले आहे तर काही जणांनी टीकेचा सूर लावला आहे. लोकांनी या कलाकारांना ही उपाधी दिली आहे. त्यामुळे त्यावर तोंडसुख घेण्याची आवश्यकता नसल्याचे काही जणांनी म्हटले आहे.