मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या राज्यातील ठाकरे सरकार हे अस्थिर झाल्याचे बोलले जाते आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूना एकत्र येण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे – पाटील यांनी केले आहे.
दोन्ही लेकरांनी एकत्र यावं
राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना रुपाली यांनी म्हंटले की , ‘हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावं, ही माझी इच्छा आहे, असं विधान मनसेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी भाजप वर ही निशाणा साधला आहे. ‘ राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती नेमकी कुणामुळे आहे. त्यात नेमका कुणाचा दबाव आहे. कोण सत्तेसाठी काय करत आहे. हे आता वारंवार सांगण्याची गरज नाही’ .असे त्या म्हणाल्या.
हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकत्र येणे गरजेचं
ज्यावेळी भगवान रामांना वनवासात जायची वेळ आली होती. त्यावेळेस त्यांचा भाऊ लक्ष्मण सगळं सोडून त्यांच्यासोबत गेले होते.आता देखील राम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे असं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावी अशी इच्छा देखील रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी मराठीच्या मुद्द्यावरून आग्रही भूमिका घेतात. शिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी भाषा टिकवण्यासाठी मुंबईत मराठीचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी पावलं उचलली आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मराठी माणसाची अस्मिता टिकून राहण्यासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावं असं ठोंबरे यांनी म्हंटल आहे.