मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना चारही बाजूंनी संकटांनी घेरलेली आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेला चांगलंच महागात पडल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार केव्हाही कोसळेल अशी सध्या स्थिती असताना बंड केलेले आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करीत आहेत. अशात मनसेनेही तोंडसुख घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी ट्विट करीत शिवसेनेवर निशाणा साधलाआहे. स्वतःच्याच पक्षातला केमिकल लोचा यांना कळला नाही असं शालिनीताई यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही…#सर्किट #कलानगर #केमिकललोच्या #विधानपरिषदनिवडणूक #एकनाथ_शिंदे #शिवसेना
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 24, 2022
काय आहे शालिनीताईंचे ट्विट ?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर झालेल्या प्रकरणावरून शालिनीताई यांनी ट्विट करीत म्हंटले की, स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही…” अशा आशयाचे ट्विट शालिनीताई ठाकरे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एका सभेत राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांचा काहीतरी केमिकल लोचा झाल्याचं म्हटलं होतं. आता शालिनी ठाकरे यांनीही शिवसेनेच्या बिकट परिस्थितीत उद्धव ठाकरेंवर त्यांचे शब्ध घेऊन टीका केली आहे.