कुर्डुवाडी – परंडा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉ तानाजी सावंत यांनी परांडा शहरातील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यामार्फत कै. गोपीनाथ मुंडे या सभागृहात जनता दरबार भरवण्यातआला. यावेळी परंडा तालुक्यातील अनेक नागरिकांनी कै.गोपीनाथ मुंडे या सभागृहात एकत्र येऊन जनता दरबारामध्ये २५५ तक्रारीचा फॉर्म भरून घेण्यात आले . यात ८० आर्ज तहसील कार्यालयासाठी व १८ अर्ज सार्वजनिक बांधकाम साठी व ४२ पंचायत समिती साठी कृषी विभाग साठी ४ व भुमिअभिलेख विभागासाठी ९, तर सीना-कोळेगाव विभागासाठी ४आणी, महावितरण साठी 44 पाणीपुरवठा विभागाचे साठी २ तर बँकासाठी11 तर आमदार यांच्या नावाने 18 आणि उपविभागीय अधिकारी भूम व लघु पाटबंधारे साठी 3 अशाप्रकारे तक्रारी अर्ज दाखल झाले .
आमदार डॉ तानाजी सावंत यांनी जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा संपर्क साधून अडीअडचणी दूर कराव्यात असा आदेश केला . यावेळी परांडा शहरातील माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, परंडा शहराचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर साहेब, परंडा पोलीस स्टेशनचे सुनील गिड्डे साहेब , गट विकास अधिकारी संतोष नागटिळक साहेब, महसूल विभागाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मनीषा वडपल्ली मॅडम, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर , माजी कृषी पशुसंवर्धन सभापती दत्ता अण्णा साळुंखे , रामचंद्र घोगरे, गौतम लटके, सुभाष मोरे, संतोष सूर्यवंशी, माजी नगरसेवक संजय घाडगे , माजी नगरसेवक मकरंद जोशी , युवासेना प्रमुख वैभव पवार, श्याम मोरे, इरफान शेख , जावेद पठान , प्रशांत गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.