नवी दिल्ली – भारतीय युवक कॉंग्रेसने शनिवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त “राजीव क्रांती भारत जोडो” मोहीम सुरू केली.
यावेळी देशभरातून युवक कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते तालकटोरा स्टेडियमवर पोहोचले. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या क्रांतिकारी विचाराने तरुण भारताचा पाया घातला.
“आज आपण ज्या डिजिटल क्रांतीमध्ये आहोत, त्याचा पाया राजीव गांधींनी देशात घातला होता. राजीव यांनीच वयोमर्यादा कमी करून तरुणांना मतदानाची ताकद दिली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एका नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. या मोहीमे अंतर्गत लोकांपर्यंत पोहचून पक्षाचा संदेश देण्याचा उपक्रम युवक कॉंग्रेस राबवणार आहे.