पिंपरी – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्याने शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणाही ठप्प झाली. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
विद्युत वितरण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या 400 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी (दि. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास पाच ठिकाणी ट्रिपींग आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे पिंपरी-चिंचवड शहरीतल वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
शहरातील विविध भागात सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत आणि काही भागात दुपारी चार वाजेपर्यंत वीजपुरवठा विस्कळीत होता. वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने रावेत जलउपसा केंद्र बंद झाले होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा देखील विस्कळीत झाली. त्यामुळे महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.