नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात सध्या 16 वर्षाची मुलगी मध्यरात्रीही दागिने घालून फिरू शकते असे जे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे, ते विधान म्हणजे एक जुमला असून या राज्यात मुलींवर आणि महिलांवर सध्या जी परिस्थिती गुदरली आहे ती केवळ महिलाच जाणू शकतात असे नमूद करीत गृहमंत्र्यांच्या विधानाला प्रियांकांनी ट्विटरवर आक्षेप घेतला आहे.
कानपुर मध्ये तीन महिलांच्या गळ्यातील चेन हिसकाऊन नेण्याचा प्रकार अलिकडेच घडला आहे त्यांच्या बातमीचे कात्रणही प्रियांकांनी आपल्या ट्विटर हॅंडलला जोडून अमित शहांच्या विधानातील हवा काढून घेतली आहे.
महिलांना या राज्यात अतिशय भयंकर स्थितीचा सामना करावा लागत असून त्यामुळेच लडकी हुँ लड सकती हुँ च्या घोषणेला महत्त्व आले आहे असे ते म्हणाले.
महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवला तरच या राज्यात महिलांसाठीचे सुरक्षेचे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळणार आहे असेही प्रियांकांनी नमूद केले आहे.