नवी दिल्ली : कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानकझाई यांची भेट घेतली.
या दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षितता आणि जलद भारतात परतण्याबाबत चर्चा झाली. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरोधात दहशतवादासाठी वापर होऊ नये, याबाबत भारताने तालिबानकडे चिंता व्यक्त केली. तालिबानने यावेळी भारताशी संबंधित समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचे आश्वासन दिले. ()
परराष्ट्र मंत्रालयाने हे निवेदन जारी केले आणि या बैठकीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानकझाई यांची भेट घेतली. ही चर्चा अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या जलद भारतात परतण्यावर केंद्रित होती.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “राजदूत दीपक मित्तल यांनी भारताकडून चिंता व्यक्त केली की अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही प्रकारे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी वापरली जाऊ नये. तालिबानच्या प्रतिनिधीने राजदूताला आश्वासन दिले की, हे मुद्दे सकारात्मकपणे सोडवले जातील.