मुंबई – महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने राज्याचं राजकारण तापलं आहे. यावरून भाजपनेते निलेश राणे यांनी ट्विट करून पटोले यांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.
दरम्यान या संदर्भात शरद पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर पवार म्हणाले की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना अनुलेखाने टाळल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, ‘पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला.’
अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की पवार साहेबांनी त्यांना पान टपरी वालाचं करून टाकला. https://t.co/lY3cxkv4Yd
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 11, 2021
यावर अद्याप काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर याआधी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील नाना पटोले यांना टोला लगावला होता.