दिसपूर : देशात ‘लव्ह जिहाद’ या शब्दावरून काही ठिकाणी वाद सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानुसार लव्ह जिहाद म्हणजे मुस्लीम तरूण कथितरित्या हिंदू तरुणींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. हा प्रेमाचा बनाव केवळ धर्मांतरणासाठी केला जातो. तसंच मुलींचा शारीरिक आणि लैंगिक छळही केला जातो. हिंदुत्ववाद्यांकडून आपली खरी ओळख लपवून (विशेषत: मुस्लीम धर्म) मुलीला फसवण्याच्या प्रकाराला ‘लव्ह जिहाद’ संबोधलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण बरंच तापलं आहे.
Hindu boy lying to a Hindu girl is also Jihad. We will bring a law against it: Assam CM Himanta Biswa Sarma (10.07) pic.twitter.com/nbydAHrb3D
— ANI (@ANI) July 10, 2021
यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी जिहाद विषयी एक अगळं-वेगळं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’ हिंदू मुलांचं हिंदू मुलींशी खोटं बोलणं हे सुद्धा जिहाद आहे. त्यामुळे यावर आता आसाम सरकार कायदा आणार आहे.’
ते पुढे म्हणाले,’धार्मिक ओळख लपवून आणि मुलींशी खोट बोलून मुलांपासून होणाऱ्या धोक्याला आळा घालण्यासाठी हा कायदा आणणार आहे. हा कायदा हिंदू आणि मुस्लिमांसाठी समान असेल.’
दरम्यान, हिंदुत्वविषयीही शर्मांनी माध्यमांसमोर आपलं मत मांडलं. हिंदुत्व एक जीवनशैली आहे, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं आहे. बहुतेक धर्मांचे अनुयायी हिंदूंचे वंशज आहेत, असा दावा त्यांनी केला.