पुणे : पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही. @OfficeofUT @Dev_Fadnavis #MPSC pic.twitter.com/hvpgiqqLZO— Ram Satpute (@RamVSatpute) July 3, 2021
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये स्वप्निलने, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका असे त्यामध्ये त्याने म्हटले आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/133566752146921
यावर आता भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त करत सरकारवर आरोप केला आहे. स्वप्निल लोणकरची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले राम सातपुते
‘स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही.’
ते पुढे पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’या अधिवेशनात विधानसभेच्या दारावरती एमपीएससीची पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार असल्याचा इशारा राम सातपुते यांनी यावेळी दिला आहे.’