ब्रिस्टल – कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या क्रिकेटच्या तीनही प्रकारांसाठी शेफाली वर्मा अत्यंत उपयुक्त खेळडू आहे, अशा शब्दांत भारतीय संघाची मर्यादित सामन्यांच्या संघाची कर्णधार मिताली राजने आपले मत मांडले आहे.
शेफालीने इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत दमदार अर्धशतकी खेळी केली. तिच्या कामगिरीमुळेच भारताच्या महिला संघाला पराभव टाळण्यात यश आले.
तिच्या या खेळीचेही कौतुक मितालीने केले. शेफाली क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात भारताची सर्वात महत्त्वाची फलंदाज ठरेल, असेही मितालीने सांगितले.