पुणे – मल्टी नॅशनल कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तब्बल साडेनऊ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. या महिलेला फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करणारी उच्चशिक्षित महिला यांनी नोकरी मिळविणेकरीता ऑनलाईन विविध जॉब पोर्टलवर त्यांचा बायो डाटा अपलोड केला होता. फेब्रुवारी व मार्च मध्ये सदर महिलेस आरोपींनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक व बनावट डोमेन तयार करुन
त्यावरुन बनावट ई-मेल आय.डी.चा वापर करुन त्यांना संपर्क साधला गेला. त्यांना पुणे व मुंबई येथे मल्टी नॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे अमिष दाखविले.
महिलेस आरोपींनी प्रत्येक वेळी रजिस्ट्रेशन फी, मुलाखतीकरीता फी, वैद्यकीय चाचणी फी, जॉब
कन्फरमेशन, सिक्युरीटी आयडी, बॉंड कन्फरमेशन, जीएसटी, टिडीएस, रिफंड प्रोसेस, फंड ट्रान्सफर अशी वेगवेगळी कारणे सांगून पेमेंट लिंकद्वारे त्यांना पैसे भरावयास लावले. त्यांची एकुण 9 लाख 25 हजार 380 रु.ची फसवणुक केली म्हणून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने ताबोडतोब तांत्रिक तपासाचे साहाय्याने नमूद गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन, आरोपींचे बॅंकांची माहिती प्राप्त करण्यात आली. यानंरत त्यांची आरोपींची बॅंक खाती गोठवली. न्यायालयात पाठपुरावा करुन वेळेत रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचे आदेश पारित करुन घेवून फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी रु.9 लाख 13 हजार 708 एवढी रक्कम म्हणजे टक्के रक्कम फिर्यादी यांनापरत मिळवून दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, पोली निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस अंमलदार अस्लम आत्तार, पोना मंगेश नेवसे, सोमनाथ भोरडे, योगेश वाव्हळ, प्रविणसिंग राजपूत, शिरीष गावडे, अमोल कदम, मपोशि उमा पालवे, पूजा मांदळे या पोलीस पथकाने केली.
अशा प्रकारे ऑनलाईन पध्दतीने नोकरीचे, लॉटरीचे, बक्षिसाचे, लोन मंजूर करण्याचे अमिष दाखवून पैसे भरावयास लावणा-या गुन्हेगारी टोळयांपासून नागरीकांनी सावध राहून अशा अमिषांना बळी पडू नये, अशा घटनांबाबत तात्काळ सायबर पोलीस स्टेशनयेथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.