मुंबई – देशासह राज्यात करोनाची परिस्थिती अतिभंयकर स्थितीत जाऊन पोहचली आहे. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत लोकांना लसीकरण करण्यात येणार नाही तोपर्यंत करोनावर नियंत्रण येणार नाही. असे असताना केंद्राकडून राज्यात लसीकरणावरुन दुजाभाव केला जात असून यासंदर्भात कॉंग्रेसकडून भाजपला 13 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 2 कोटी लस तर, गुजरात मध्ये 6.50 कोटी लोकसंख्येला 1.62 कोटी लसी का? असा सवाल केला आहे.
१. @BJP4Maharashtra & @Dev_Fadnavis जीं साठी दोन साधेसोपे प्रश्न
जर महाराष्ट्राच्या 1३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर
गुजरात च्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का?
तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या? https://t.co/3nIpay0Hdh— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 21, 2021
महाराष्ट्र राज्याला आतापर्यंत दोन कोटी लसीचा पुरवठा केंद्राकडून करण्यात आला आहे. यावर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत व्टिट करत म्हणाले की, ”भाजप आणि देवेंद्र फडणवीसजीं साठी दोन साधेसोपे प्रश्न जर महाराष्ट्राच्या 1३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर गुजरात च्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का?” तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या?”
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागा कडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर आहे. मात्र राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून अनेकदा लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे.