लॉकडाऊनमुळे बहुतेक सर्व सिरीयलचे शुटिंग थांबवले गेले आहे. त्यामुळे “तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी आपल्या सिरीयलचे शुटिंग मुंबईबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले सर्व कलाकार आणि सहकाऱ्यांना घेऊन मुंबईबाहेर जाऊन शुटिंग सुरू ठेवले आहे. त्यांनी चक्क बायो बबल तयार करवून घेतला आणि शुटिंग व्यवस्थित सुरू केले आहे.
त्यांनी मुंबईच्या बाहेर एक रिसॉर्ट भाड्याने घेतला आहे आणि तेथे शुटिंग सुरू ठेवले आहे. तिथे जाण्यापूर्वी सर्व कलाकार आणि सहकाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेतली. मुंबईमधून जर कोणी येणार असेल, तर त्याचीही करोना चाचणी केली जाते. या रिसॉर्टमध्ये अगदी आवश्यक तेवढेच सहकारी ठेवण्यात आले आहेत.
आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपण आपल्या कलाकारांची काळजी घेत आहोत. कारण “तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही गेल्या 13 वर्षांपासूनची आपली फॅमिली झाली असल्याचे मोदी म्हणाले. प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये खंड पडायला नको, म्हणून बायोबबलचा आधार आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.