मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने “बच्चन पांडे’चे शूटिंग पूर्ण केले असून तो आता आपल्या आगामी “राम सेतु’ चित्रपटाच्या तयारीत आहे. अक्षय कुमार हा 18 मार्च रोजी राम जन्मभूमि असलेल्या अयोध्येला जावून तेथूनच “राम सेतु’ चित्रपटाच्या शुभारंभ करणार असल्याचे समजते. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह अक्षय कुमार हा 18 मार्चला अयोध्येला जाणार आहे.
View this post on Instagram
मात्र या चित्रपटांवर अभिनेता कमाल आर. खान यानं निशाणा साधला आहे. कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर तो रोठकोपणे प्रतिक्रिया देतो. यातच त्याने “तुझ्याकडे आता केवळ तीन-चार वर्षच उरली आहेत. वाट्टेल तेवढी मजा करुन घे,” असा उपरोधिक टोला त्यानं लगावला आहे. सध्या ट्विटवर या ट्विटची चांगलीच चर्चा सुरु असून, अक्षयच्या चाहत्यांनी या ट्विटवर संताप व्यक्त केला मात्र खुद्द अक्षयनं मात्र अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
No buyer available for Akshay kumar films. His films like #Sooryavanshi & #bellbottom are not getting released. But he is launching one new film every month n shooting 24*7! Becas he knows that he is having 2-3Yrs only to make money. Crazy producers are paying him Approx 125Cr!
— KRK (@kamaalrkhan) March 20, 2021
दरम्यान, राम जन्मभूमि असलेल्या या ठिकाणीच चित्रपटातील पहिला शॉट शूट करण्यात येणार आहे. अक्षय सध्या मालदीवमध्ये आपल्या कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेत आहे. तेथून परतल्यावर तो लवकरच या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. पुढील काही महिन्यांमध्ये चित्रपटातील शेड्यूल शूट करण्यात येणार आहे. या चित्रपटातील 80 टक्के शूटिंग मुंबईत होणार आहे.
View this post on Instagram
“राम सेतु’मध्ये अक्षय कुमारसह जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारचा नवीन अवतार चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.