अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु आहे. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात आघाडी घेतली असून दरम्यान यष्टीरक्षक रिषभ पंतने षटकार खेचत आपलं शतक साजर केलं आहे.
रिषभ पंतने 115 चेंडूत शतक पूर्ण केलं असून भारताच्या सध्या भारताच्या 83.1 षटकांत 6 बाद 258 धावा झाल्या आहेत. सध्या भारताकडे 55 धावांची आघाडी झाली आहे. रिषभ पंत सोबत वाॅश्गिंटन सुंदर मैदानात असून तो 40 धावांवर खेळत आहे.