पुणे – पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेमध्ये कोणतेही गट नाहीत, जो आदेश येईल तो मान्य करावाच लागेल. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे, पोलीस महासंचालकांच्या पातळीवर माहिती घेतली जात आहे. त्यामुळे बोलणे योग्य नाही. राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील, असे शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये कोणतेही वाद नाही.
लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे ते राज्य सरकारला काही पत्र लिहितात आणि राज्य सरकार लोकशाहीप्रमाणे त्यांना पत्र लिहून उत्तर देते. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळचा आहे, तर उच्चशिक्षण मंत्री म्हणून माझा राज्यपालांशी संवाद असतो.