मुंबई – टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील. मात्र, भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली असून या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल,’ अशी टीका मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. आता मुख्यमंत्री राजीनामा स्विकारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.