नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एका अध्यादेशानुसार येत्या 1 जानेवारी 2021 पासून सर्व चार चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले होते. परंतु, केंद्र सरकरने आता फास्टॅग लावण्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक असणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. परंतु आता केंद्र सरकारडून फास्टॅग लावण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्हीची बचत होणार आहे.
फास्टॅग ही संकल्पना 2016पासून सुरू करण्यात आली. चार अधिकृत बॅंकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना फास्टॅग वितरित केले जातात. 2017 मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला. आणि 2018च्या अंती हा आकडा 34 लाखांवर जाऊन पोहोचला आहे. १५ जानेवारी 2021पासून फास्टॅग बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले. 1 डिसेंबर 2017 च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टॅग बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची व्हॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.