नवी दिल्ली: रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्या केवळ लॉकडाऊनमुळे घरापासून दूर अडकून पडलेल्यांना परत घरी जाता यावे याकरताच संबंधित राज्यसरकारांच्या विनंतीवरूनच चालवण्यात येत आहेत, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, प्रवासात मधेच अडकलेले यात्रेकरू आणि पर्यटक यांना ही सुविधा राज्यसरकारच्या शिफारसीवर उपलब्ध आहे. इतर सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असून कोणालाही वैयक्तिकरीत्या किंवा गटाने प्रवास करता येणार नाही.
सर्व स्थानकावर तिकीट विक्री बंद आहे. उपनगरी वाहतूकही बंद आहे. यासंदर्भात कोणीही अफवा पसरवू नये अथवा त्यावर विश्वास ठेवू नये असे रेल्वेने सांगितले आहे.
दरम्यान, एक हजार स्थलांतरित मजुरांना घेऊन काल रात्री विशेष श्रमिक एक्सप्रेस भिवंडीहून उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूरकडे रवाना झाली. त्यात 1,200 मजूर होते.