नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या वाढत्याप्रादु र्भावामुळे त्रस्त आहे. देशातसुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं आहे. मागील २४ तासात देशभरात कोरोना विषाणूचे तब्ब्ल २ हजार ४८७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील २४ तासात ८३ कोरोनाबाधित रुग्णांचा प्राण गेला आहे.
2487 new #COVID19 positive cases, 83 deaths reported in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/rx1r2lyxEe
— ANI (@ANI) May 3, 2020
आज सापडल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे देशातील एकूण रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार गेला आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ४० हजार २६३ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १० हजार ८८६ कोरोनाबाधित रुग्ण या घातक आजारातून बरे झाले आहेत. आज झालेल्या ८३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे देशभरातील कोरोनाबाळींचा १ हजार ३०६ वर पोहचला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्यामुळे केंद्र सरकाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊनमध्ये ढील देण्यात आली आहे.काही भागात दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र रेड झोनमध्ये दारू विक्री करण्यास सरकारतफे परवानगी देण्यात आली आहे. तसेच सलूनच्या दुकाने देखील काही ठिकाणी उघडण्याची परवानगी दिलेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे.