नवी दिल्ली: देशातील करोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून ते प्रमाण आता 8 टक्क्यांवरून 13 टक्के इतके झाले आहे अशी माहिती प्रसृत आकडेवारीवरून दिसून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार देशातल्या 13387 करोनाग्रस्तांपैकी 1748 लोक बरे झाले असून हे प्रमाण 13 टक्के इतके आहे.
गेल्या शनिवारी हे प्रमाण 8 टक्के इतके होते. हे जरी खरे असले तरी अजूनही महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि तामिळनाडु या राज्यातील करोनाग्रस्तांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. करोनाग्रस्तांवरील उपचारांमध्ये विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आता अधिक सुसुत्रता बाळगली जात आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले असले तरी हे प्रमाण अजून समाधानकारक स्थितीत येण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.