बारामती -“महा कृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेत कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या बारामती परिमंडलातील 72 हजार 751 शेतकऱ्यांचे तब्बल 75 कोटी 48 लाख रुपये माफ झाले आहेत.
सुधारित थकबाकीच्या 50 टक्का रक्कम भरल्यास उर्वरित थकबाकी माफ होत आहे. वीजबिल भरल्याचे प्रमाणपत्रच शेतकऱ्यांना महावितरणतर्फे दिल्याने शेतकरी थकीत वीजबिल भरण्यासाठी पुढे येत आहेत.
बारामती परिमंडलातील 7 लाख 36 हजार 932 शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी 72 हजार 751 शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेचा फायदा घेतला आहे. त्यांनी थकीत व चालू बिलापोटी मिळून 115 कोटींचा भरणा केला.
त्यातील थकबाकीच्या 50 टक्के रक्कम सुमारे 75 कोटी माफ झाली. यामध्ये बारामती मंडलातील 28390 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे 41.40 कोटी रुपये भरले आहेत.