- खडकवासला, पानशेत व वरसगाव धरण शंभर टक्के भरले
- मुठा नदीत 45 हजार क्यूसेक विसर्ग सुरू
पुणे – शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला प्रणाली मधील पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे मुठा नदीला पूर आला असून पवना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे मुळा नदीलापूर आला आहे. परिणामी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले असून शहारतील तब्बल 600 हुन अधिक कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावासामुळे पुणे शहारातील मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्राच्या बाहेर पाणी वाहू लागल्याने, नदीकाठच्या पाचशे रहिवाशांना महानगर पालिकेच्यावतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार आतापर्यंत शहराच्या विविध भागातील एकूण ६८० कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. पाण्यामुळे बाधीत झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे. हे पथक महापालिकेच्या मुख्यइमारतीत तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तत्काळ पाठविण्यात येणार आहे.
स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची संख्या व त्यांना राहण्यास दिलेली ठिकाणं –
१) आदर्शनगर, बोपोडी (२६० कुटुंब) – राजेंद्र प्रसाद शाळा
२) शांती नगर येरवडा, (३०० कुटुंब) – परुळेकर शाळा
३) कामगार पुतळा, (१३ नागरिक) – दहा नंबर शाळा
४) पाटील इस्टेट, (पाच कुटुंब) – घोले रस्ता पीएमसी काॅलनी शाळा शिवाजीनगर
५) खिलारे वस्ती, (५० कुटुंब) – उपाध्याय शाळा
६) सिंहगड रस्ता – (८० कुटुंब)