मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील पाऊस बाधित शेतकऱ्यांसाठी 5,380 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुख्यमंत्र्यानी ट्विटर अकाउंटवर हि माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पावसाने बाधित शेतकर्यांना अतिरिक्त मदत व मदतीसाठी अजित पवार यांच्याशी विविध उपायांवर चर्चा केली.
यापूर्वी मध्य प्रदेशातील शेतकर्यांसाठी सुद्धा निर्णय घेण्यात आला, केंद्र सरकारने मध्य प्रदेश सरकारला 1000 कोटी रुपये दिले. मध्य प्रदेशात जास्त पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्यातील कमलनाथ सरकारने केंद्राकडे 6621 कोटींची मागणी केली होती.
CM @Dev_Fadnavis sanctions another ₹5380 crore from Maharashtra Contingency Fund to give relief to unseasonal rain affected farmers. https://t.co/qLmtN2x2f1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 25, 2019