बिकानेर – राजस्थानमध्ये धान्य साठवण्याच्या कोठीत पडून पाच चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता.21) बिकानेर येथील हिम्मतसार भागात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धान्याची कोठी रिकामी होती. त्याचे झाकण उघडे होते. खेळता-खेळता मुलांनी एकापाठोपाठ एक सर्वांनी कोठीत उडी घेतली. मात्र अचानक कोठीचा दरवाजा बंद झाला आणि पाचही चिमुकल्याचा धान्याच्या कोठीत गुदमरून दुर्दैवी अंत झाला.
सेवाराम (वय-4 वर्ष), रविना (7), राधा (5), पूनम (8) आणि माली अशी मृत्यू पावलेल्या पाच चिमुकल्यांची नावे आहेत. मुलांची आई जेव्हा घरी आली तेंव्हा त्यांना मुले कुठेही दिसत नव्हती. कोठीचा दरवाजा उघडला असता चिमुकल्यांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रीति चंद्रा करत आहेत.