नवी दिल्ली – प्रधानमंत्री जनधन योजनेत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) देशात सुमारे 46 कोटी नवीन बॅंक खाती उघडण्यात आली आणि त्याद्वारे देशातील सामान्य जनतेला वित्तीय समावेशकतेत सहभागी करून घेण्यात आले. सर्वसमावेशक विकासासाठी ही एक मोठी बाब आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले आहे.
जनधन योजनेच्या आठव्या वार्षिक वर्धापन दिनानिमीत्त त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत बॅंक सेवा पोहचवण्याचा हा एक प्रयास आहे आणि त्याद्वारे त्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरीत केला जाऊ लागला असून प्रत्येक खातेधारकांना देण्यात येत असलेल्या रूपे कार्डाद्वारे डिजीटल पेमेंट सिस्टीमचेही मोठ्या प्रमाणात प्रमोशन झाले आहे असे त्या म्हणाल्या.
बॅंक सेवेच्या बाहेर असलेल्यांना या सेवेत आणणे, असुरक्षित लोकांना र्आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना पैसा उभारण्याची संधी देणे ही मलभूत कामे यातून झाली आहेत असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 28 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधानांनी देशात जनधन योजनेची सुरूवात केली होती. (46 crore new bank accounts opened under Pradhan Mantri Jan Dhan Yojana, a big deal – Nirmala Sitharaman)