नवी दिल्ली: तामिळनाडूच्या रायपुरममधील संरक्षणगृहात 35 मुले कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला उत्तर मागण्यासाठी नोटीस बजावली आहे.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने बाल सुधारगृहात कोरोनाबाबत कठोर कारवाईची नोटीस बजावली. सुप्रीम कोर्टाने विचारले की, आदेश असूनही कोरोना पॉझिटिव्ह का निघाले? काळजी का घेतली नाही? कोर्टाने नोटीस बजावत राज्य आरोग्य सचिवांकडे जाब विचारला. आता याप्रकरणी सोमवारी (15 जून) रोजी सुनावणी होईल.
याशिवाय संस्थांमधील मुलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांकडून अभिप्राय मागविला आहे. कोर्टाने म्हटले आहे की आम्ही राज्य सरकारांना प्रश्नावली पाठवित आहोत. हायकोर्टाच्या किशोर न्याय समित्या प्रश्नावली पाठवून डेटा प्राप्त करतील.