निघोज,(वार्ताहर) – बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीत ३३ कोटी ३५ लाखाने वाढ झाली. संस्थेच्या ठेवी २२२ कोटी ४५ लाख, कर्ज १४६ कोटी ९२ लाख, बँकेतील गुंतवणूक १२५ कोटी ४७ लाख, निव्वळ नफा ४ कोटी ७२ लाख झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी दिली.
संस्थेचे भागभांडवल ५ कोटी ९४ लाख, निधी ३३ कोटी ५९ लाख, कायम मालमत्ता ४ कोटी ९६ लाख, एकूण व्यवसाय ३६९ कोटी ३७ लाख इतका आहे. थकबाकी – ३.९५ टक्के, नेट एनपीए ० टक्के अशी संस्थेची आर्थिक स्थिती असून, स्व. बाबासाहेब कवाद यांनी घालून दिलेल्या आदर्शाची जपणूक करून संचालक मंडळ नि: स्वार्थीपणे काम करीत असल्याने मोठया प्रमाणात ठेवीमध्ये वाढ झाली . संस्थेचे सभासद ,ठेवीदार,खातेदार ,कर्जदार यांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात दाखविलेला विश्वास व संस्थेच्या संचालक मंडळाने केलेले सहकार्य व सेवकांनी ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा या गोष्टीमुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतीत वाढ झाली.
पारनेर तालुक्यातील काही पतसंस्थेमध्ये आर्थिक अडचणींमुळे ठेवीदारांना ठेवीच्या रकमा मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांनी वीस ते एकवीस वर्षात संस्थेचा आर्थिक पाया अतिशय भक्कम केला आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पतसंस्थेमध्ये ही संस्था अग्रगण्य आहे.
मोठ्या पतसंस्थाना घरघर लागली असून बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीत अहवाल वर्षात साडे तेहसीस कोटींनी वाढ झाली असून नफा सर्वाधिक पावणेपाच कोटी झाला. चेअरमन वसंत कवाद, व्हा.चेअरमन नामदेवराव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांच्याच कार्याचे अनुकरण करीत पतसंस्थेला गतवैभव प्राप्त करून दिले असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.