निघोज, {कवी हनुमंत चांदगुडे} (वार्ताहर) – आधुनिक भारतासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित असून त्यांच्यासाठी प्रेरणामय वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे मुलिका महोत्सवानिमित्त विविध दिवस साजरे करून वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. प्रा. रुपाली गोरडे यांनी स्वागत गीत यावेळी सादर केले. प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सनमानचिन्ह व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरीबदल प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर एरंडे यांनी केले. वार्षिक अहवालवाचन कार्याध्यक्ष प्रा. अशोकराव कवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आनंद पाटेकर व नूतन गायकवाड यांनी केले. पालक, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.