मंचर -आंबेगाव तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले परराज्यातील व परजिल्ह्यातील मजुरांना मंचर बसस्थानकातून रवाना करण्यात आले. सुरुवातीला त्यांचे थर्मल स्क्रीनिंग, तसेच प्राथमिक तपासणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क वापरणे या बाबींचा अवलंब करीत 312 जणांना 11 एसटी बसमार्फत मंचर शहरातून जळगाव, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर रवना करण्यात आले.
सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एसटी अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून बस उपलब्ध करून दिल्या आहेत. एसटी चालकांना शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. तालुक्यात अडकून पडलेल्यांना तहसीलदार रमा जोशी आणि संपूर्ण तालुका महसूल प्रशासनाने नियोजन करून विविध जिल्ह्यांत रवाना केले आहे. आवश्यकतेनुसार आणखी बस सोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून परराज्यात किंवा राज्यात जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. सर्वांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. प्रशासनाकडून आपणाला प्रवासासाठी सूचित केले जाईल. त्यामुळे कुणीही पायी किंवा विनापरवानगी जाण्याचा प्रयत्न करू नये. आपण जोपर्यंत मंचर शहरात आहात तोपर्यंत आपल्याला जेवण व अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी मंचरकराची आहे.
– दत्ता गांजाळे, सरपंच, मंच