मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पंतप्रधान मोदींच्या ठाम नेतृत्वाला जनतेची साथ मिळाली आहे. अशाच आत्मविश्वासाने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदींनी मंगळवारी निर्णय जाहीर केला. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के असे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले आहे. याचा लाभ करोनाची झळ बसलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळेल. जनसामन्यांना दिलासा देणारे आणि आशा निर्माण करणाऱ्या घोषणेचे भाजप स्वागत करते, असे त्यांनी म्हंटले आहे.
स्वावलंबी भारत अभियानाची घोषणेबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत स्वयंपूर्ण होईल. आणि प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यात चांगला बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान @narendramodi यांनी देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल. pic.twitter.com/Ueny2Ir2MZ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 12, 2020
दरम्यान, 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली. कुटीर, गृह, लघू उद्योगासाठी पॅकेज, शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं पॅकेज, मध्यमवर्गीयांसाठीही हे पॅकेज महत्वाचं, भारतीय उद्योग जगतासाठीही हे पॅकेज, ह्या पॅकेजची सविस्तर माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देणार आहेत.