सातारा (प्रतिनिधी) : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यांतून १७ मे अखेर ई-पास वगळता २५६४१ नागरिकांनी चेक पोस्टवरुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, तमीळनाडू, तेलंगणा, दादरा आणि नगर हवेली, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार,मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाना मधून १७४१ नागरिक आले आहेत. तर २३९०० हे राज्यातील इतर जिल्ह्यांतून आले आहेत.
सातारा जिल्ह्यात प्रवेश करुन विविध तालुक्यात गेलेल्यांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे
कराड- ३२९६, कोरेगाव-१४७०, खंडाळा-११०४, खटाव-३११९, जावळी-१४७०, पाटण-२५६२, फलटण-२१७२, महाबळेश्वर- १४०१, माण-२३७२, वाई-१९३० व सातारा तालुका-४७४५ अशा एकूण २५६४१ नागरिकांनी विविध तालुक्यांत प्रवेश केला आहे.