निमोणे -चिंचणी (ता. शिरूर) येथील सात टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या घोड धरणात 1.2 टीएमसी (25 टक्के) पाणीसाठा राहिला आहे.
सध्या घोड धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून हे आवर्तन 2 दिवसांत संपणार असल्याची माहीती घोडचे कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी दिली.
घोड धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 66.68 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 35.37 दशलक्ष घनमीटर तर मृत पाणीसाठा 31.31 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन 25 एप्रिलपासून सुरू होईल, असा अंदाज आहे.