सातारा (प्रतिनिधी)- येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात जावळी तालुक्यातील वहागांव येथील ७० वर्षीय करोनाबाधित महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आतापर्यंत करोनामुळे जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ५१६ करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १५८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३३७ जणांवर उपचार सुरु असून आहेत. जिल्ह्यातील २६२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे पुण्यातील एन.सी.सी.एस. यांनी कळविले आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 516 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 158 रुग्ण बरे झाले आहेत. तर 338 रुग्णांवर उपचार सुरु असून 20 जणांचा मृत्यु झालेला आहे.