सविंदणे – अनेक मोबाईल गहाळ, चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुशंगाने गहाळ व चोरी झालेल्या तब्बल २० मोबाईल शिरूर पोलिसांनी शोधून नागपंचमीच्या दिवशी नागरिकांना परत केले आहे. तब्बल २० मोबाईल हस्तगत केल्याने पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर नागरीकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप ,सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव यांचे हस्ते नागरीकांना हस्तगत केलेले मोबाईल परत केले आहे. गहाळ झालेले मोबाईल शोधण्याचे कार्य पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांनी केले आहे.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना चोरीचे मोबाईल खरेदी करू नये. बिल असल्याशिवाय ते मोबाईल खरेदी करू नये. बाजारामध्ये, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वरच्या खिशात ठेवू नये. असे आवाहण शिरूर पोलिसांनी केले आहे.