हिंगोली – वसमत तालुक्यातील (Vasamat) पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या पॅकींग युनीटमध्ये (Sugar paking unit) तसेच गोदामात असलेली सुमारे ५ हजार क्विंटल साखर भिजल्याने (5 thousand quintals of sugar) कारखान्याचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश दळवी यांनी दिली आहे. (hingoli News)
पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरु होऊन सुमारे आठ ते दहा दिवसांचा कालावधी झाला आहे. कारखान्यात तयार करण्यात आलेली साखर पॅकींग युनीट मध्ये पाठवून त्या ठिकाणी पोते भरले जातात. त्यानंतर हे पोते गोडाऊन मध्ये ठेवले जातात. (hingoli)
मात्र मागील दोन दिवसांत या भागात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे कारखान्याच्या पॅकींग युनीटमध्ये पाणी शिरले. या शिवाय टीनशेडीमधूनही पाणी गळत असल्यामुळे तब्बल ५ हजार क्विंटल साखर भिजली आहे. यामध्ये कारखान्याचे सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिवाय गोडावून मधील काही पोते देखील भिजल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कारखान्याचे उत्पादन सध्या बंद करावे लागले आहे. (hingoli News)
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतांमधून पाणी साचले असून त्यामुळे ऊसतोड करता येत नाही शिवाय शेतात वाहने जात नसल्यामुळे वाहतुकही होत नाही. त्यामुळे शेतशिवारातील पाण्याचा पूर्णपणे निचरा झाल्यानंतरच ऊसतोड व वाहतुक करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे तुर्तास चार ते पाच दिवस तरी कारखान्याचे गाळप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वसमत तालुक्यात ३३२ हेक्टरचे नुकसान
वसमत तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार ३३२ हेक्टर हरभरा, ज्वारी व इतर पिकांचे नुकसान झाले असून ३.२० हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली आहे. या भागात नुकसानीचे पंचनामे केले जात असून त्यानंतरच नेमके किती हेक्टरचे नुकसान झाले हे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.