हिंगोली – सध्या उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. अशा स्थितीत वन्यप्राण्यांना आपली तहान भागविण्यासाठी गावांकडे धाव घ्यावी लागत आहे. परंतु पाणी मिळत नसल्याने हे वन्यप्राणी विहिरीत पडत आहेत.
अशीच दोन रोह्याची पिल्ले पाण्याच्या शोधासाठी आली असताना केलसुला शिवारातिल शेतातील विहिरीत पडली. मात्र येथील सरपंच भागवत भूतेकर यांना हि बाब समजताच त्यांनी तत्काळ ग्रामस्थांच्या वतीने त्या पिल्लांना विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडून दिले.
आत्ता मार्च महीना लागला आहे.. बहुतांश, शेतशिवारातील जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात असलेले रोहीचे दोन पिल्लं केलसुला येथील शेत शिवारातील एका विहिरीत पडले.. ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.
विहिरीत रोहीचे पिल्ले पडले असल्याची माहिती शेतकरी प्रकाश मुळे यांना मिळाली. त्यांनी वनविभागासह, कान्होबा इंगळे, सरपंच भागवत भुतेकर आणि इतर ग्रामस्थांना माहिती दिली. सरपंच भुतेकर, रामभाऊ बनगर, संजू सोनुने, संतोष पायघन यांनी दोराच्या साह्याने पिल्लांना सुखरूप विहिरी बाहेर काढले.
विहिरीबाहेर येताच पिल्लांनी जंगलात धूम ठोकली. विहीर जास्त खोल नसल्याने पिल्लांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान सेनगाव तालुक्यातील केलसुला शिवारात वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.