Colored Cabbage Farming : शेतीमध्ये चांगले उत्पन्न मिळावे यासाठी अनेक शेतकरी नवीन नवीन प्रयोग करत असतात. ज्यामध्ये रोपांपासून ते खतांपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. असाच एक अनोखा प्रयोग सध्या गोबीच्या लागवडीमध्ये पाहायला मिळतोय.नेहमीच्या गोबीसोबतच शेतकऱ्याने चक्क रंगीबेरंगी कोबीची लागवड केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याला वर्षाला तब्बल १५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
शेतकरी राजकुमार चौधरी यांनी रंगीबेरंगी कोबी पिकवण्याचा अनोखा उपक्रम केला आहे.पारंपारिक पिकांच्या तुलनेत रंगीत कोबीच्या लागवडीत अनेक पटींनी अधिक नफा मिळत असल्याचे ते सांगतात.चौधरी यांनी 4 बिघा जमिनीत पांढरा, निळा, हिरवा, जांभळा, पिवळा आणि केशरी रंगाचा कोबी घेतला आहे. रंगीबेरंगी असल्याने लोक ते आवडीने खरेदी करतात.चौधरी हे मुझफ्फरपूर (बिहार) मधील चखेलाल गावातील रहिवासी आहेत. | Colored Cabbage Farming
चौधरी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कोबीचे तीन प्रकार आहेत. यामध्ये इंग्लंड, तैवान आणि जपानचा समावेश आहे. ज्याचा रंग लाल, पिवळा हिरवा आहे. चौधरी सांगतात की बाजारात त्याची किंमत 80 रुपये ते 100 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे. | Colored Cabbage Farming
या रंगीबेरंगी कोबीपासून बनवलेली भाजी अतिशय चविष्ट असून अनेक आजार बरे करण्यास मदत करत असल्याचे ते सांगतात. त्याची लागवड नोव्हेंबर महिन्यात केली जाते आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात बाजारात विक्री केली जाते.
नफा किती मिळतो?
पांढऱ्या कोबीच्या तुलनेत रंगीत कोबीची लागवड करून अधिक उत्पन्न मिळत असल्याचे राजकुमार चौधरी सांगतात. कारण ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पांढऱ्या कोबीची लागवड करण्यासाठी 300 रुपये खर्च येत असेल तर रंगीत कोबीच्या लागवडीसाठी 1300 रुपये खर्च झाले, मात्र बाजारात त्याची किंमतही जास्त आहे.
पांढरा कोबी लागवडीचा खर्च खूपच कमी आहे. तर इतर रंगांच्या कोबीची किंमत जास्त आहे. नुकतीच पाच रंगांची कोबी लावली असल्याचे देखील चौधरी सांगतात.त्यापैकी तीन रंग तयार आहेत. 80 रुपये प्रति किलो दराने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. बाजारात रंगीत कोबी 100 ते 120 रुपये किलोने विकली जाते. | Colored Cabbage Farming
चौधरी यांना नाविन्यपूर्ण शेतीसाठी दोनदा बेस्ट ॲग्रिकल्चर परफॉर्मन्स अवॉर्डही मिळाला आहे. राजकुमार चौधरी यांनी इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर ते कृषी क्षेत्रात मास्टर ट्रेनरही आहेत. त्यांना 2002 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कृषी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.