दिवसभर काम करून संध्याकाळी घरी गेल्यानंतर रात्रीचे जेवण उरकून बरेच जण झोपण्याची तयारी करतात. दिवसभर थकल्यामुळे झोप येणे साहजिकच आहे. मात्र रात्री जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर शरीराला त्रास होतो.
याचे अनेक गंभीर परिणाम शरीरास भोगावे लागतील. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर काही वेळ का होईना पण शतपावली करणे अत्यंत गरजेचे आहे. रात्री शतपावली केल्याने शरीरास अनेक चांगले आणि हितवर्धक फायदे होतात.
रात्री 10 मिनिटं का होईना पण जेवल्यानंतर थोडे चालणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ चालल्याने खाल्लेले अन्न चांगले पचते. ज्यामुळे पित्ताचा, गॅसचा त्रास होत नाही. जेवल्यानंतर चालल्यास पचनक्रिया चांगली सुधारून खाल्लेले अन्न पचते. त्यामुळे पोट दुखणे, जळजळ होणे यांसारख्या तक्रारी जाणवत नाही.
परिणामी चांगली झोप लागते. रात्री जेवल्यानंतर नियमित थोडा वेळ चालल्याने तुमचा मेटाबॉलिजम रेट सुधारतो. ज्याचा तुमच्या फिटनेस आणि डाएट मध्ये देखील खूप फायदा होतो.
शतपावलीमुळे मन ताजेतवाने होते आणि रात्री निवांत झोप येते. शतपावली करण्यास तुम्ही घराबाहेरच पडले पाहिजे असे नाही. गॅलरी, टेरेस, अंगणातही तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे आरामात चालू शकता. शतपावली करताना फोनवर बोलणे टाळले पाहिजे.