मुंबई : रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर म्हणून मी पाच सप्टेंबर 2013 रोजी कार्यभार स्वीकारला. त्या पदावर मी सप्टेंबर 2016पर्यंत कार्यरत होतो. त्यातील आठ महिने कॉंग्रेसचे 26 महिने भारतीय जनता पक्षाचे सरकार होते, अशा शब्दात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलल्या टीकेला रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी टीका केली.
पंतप्रधानपदी मोदी आणि आरबीआयच्या गव्हर्नरपदी राजन असताना बॅंकांची स्थिती वाईट होती. त्याबाबत बोलताना राजन म्हणाले, मला या गोष्टीच्या राजकारणावर फार भाष्य करायचे नाही. माझ्या काळातही काही कर्ज बुडाल्याची प्रकरणे घडली. पण रोजगार कमी झाले नाहीत. आर्थिक विकासासाठी देशाला व्यापक फेररचनेची गरज आहे. जर भारताचा विकास दर 5 टक्क्यांवर आला असेल तर फार वाईट मंदी आहे.
मला मागील आणि नंतरच्या राजकीय भूमिकांत शिरायचे नाही. पण आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली होती. ती अजून सुरू आहे, पण ती लवकर पूर्ण व्हायला हवी. बॅंकाच्या बॅलन्स शीट मध्ये नॉन परफॉरर्मिंग लोनची रक्कम मोठी असते त्याचेळी त्यांना त्यांची ओळख आणि फेरभांडवलची सोय करून द्यावी लागते. त्यातील अर्धेच आता घडत आहे. बॅंकांचे व्यवहार पारदर्शी करतानाच बॅंकेच्या बाहेरील पतपुरवठ्याचा धोकाही उचलायला हवा अन्यथा अर्थव्यवस्था ठप्प होईल, असे ते म्हणाले.