नीरा -वीर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने धरणच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सांडव्याद्वारे नीरा नदीपात्रात 24 हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे नीरा काठच्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भोर-वेल्हे तालुक्यातील नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भाटघर, नीरादेवघर, गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वीरसह सर्व धरणे 100 टक्के भरले असून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने वीर धरणातून (दि. 14) सकळी 4 हजार 637 तर दुपारनंतर 14 हजार 511 तर सायंकाळी सातपासून 23 हजार 885 क्युसेकने पाणी सोडल्याने नीरा दुथडी भरून वाहत आहे.